वाशिम :
ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर न झुकता, भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले आणि वयाच्या २४ व्या वर्षी ते शहिद झाले. हजारो वर्षापूर्वी देशात मोठ्या प्रमाणात जंगल होते, आज ते नष्ट होत आहे. पण,आपल्या देशातील जंगलाचे खरे रक्षण हे आदिवासी बांधवांनीच केले. त्यामुळे आदिवासी बांधव हेच या देशाचे मुळ निवासी व खरे मालक असल्याचे मत खा.राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील आदिवासींच्या कार्यक्रमात खा.राहुल गांधी हे बोलत होते.यावेळी बोलताना खा.राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे,पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा तुम्हाला आदिवासी मानत नाही तर, वनवासी म्हणतात.भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर हे आक्रमण करत आहेत. वनवासी संबोधून तुमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. पण,काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कट्टीबद्ध असून काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हक्कासाठी नेहमीच सकारात्मक निर्णय घेतले. भाजपा संविधानच मानत नाही,त्यामुळे दलित, आदिवासी,वंचित आणि अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत,अशी भाजपाची भूमिका असल्याचे खा.राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात लढले.आज आपल्याला जुलमी भाजपा सरकारच्या विरोधात लढायचे आहे.भाजपा आदिवासी बांधवांचा वनवासी म्हणून अपमान करत आहे. आदिवासी बांधवांचे हक्क काँग्रेसच देऊ शकते. त्यासाठी काँग्रेसचे सरकार आले पाहिजे व राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत. देशाचे संविधान व तिरंगा सहीसलामत रहावा, यासाठीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी एच.के.पाटील, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार,खा.बाळू धानोरकर,काँग्रेस कमिटीचे सचिव सहप्रभारी आशिष दुआ व पदाधिकारी उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक