किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार राजेशजी चहर यांचा मुंबई दौरा संपन्न

मुंबई :

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील किसान मोर्चाअंतर्गत कार्यरत असणार्‍या पदाधिकार्‍यांच्या बैठकीला संबोधित करण्यासाठी किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार राजेशजी चहर हे काल मुंबई येथे आले होते.

किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार राजेशजी चहर यांचे मुंबई येथील विमानतळावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांनी राज्यातील भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच आपल्या इतर सहकार्‍यांसमवेत त्यांचे जंगी स्वागत केले.           —————————————————————————